स्वातंत्र्यप्राप्ती नंतर येथील लोक कर्नाटकात जाण्यास ईच्छुक होते, महादेवी लिंगाडे नामक कन्नड लिंगायत साहित्यिक महिलेने सोलापुर ला कर्नाटकाशी जोडण्याकरता आंदोलन देखील केले पण या विवादामुळे सरकारने महाजन आयोगाची स्थापना केली, या आयोगाने सोलापुर ला कर्नाटकाशी जोडण्यासंदर्भातला अहवाल शासनासमोर मांडला परंतु शासनाने तो धुडकावत न्यायालयाची मदत घेतली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
मराठी भाषेपेक्षा देखील जास्त प्रमाणात या ठिकाणी तेलगु आणि कन्नड भाषा बोलली जाते.
सिध्देश्वर मंदिरामुळे देखील या जिल्हयाला एक आगळ वेगळं वलय प्राप्त झालं असुन दुरदुरून भाविक येथे दर्शनाकरता येत असतात.
सोलापुरात आज देखील एका मुस्लिम किल्ल्याचे भग्नावशेष पहायला मिळतात.
सोलापुर जिल्हा सध्या सर्व त.हेच्या गणवेशांकरता ओळखला जातो, महाराष्ट्राव्यतीरीक्त हे गणवेश उपयोगात आणले जातात.